बुधवार, ३० एप्रिल, २०१४

भय महाराष्ट्र !

"भय महाराष्ट्र !"
----------------------------
आजच्या लोकसत्तेतल्या पहिल्या पानावरच्या बातमीचे हे शीर्षक आहे. महाराष्ट्र दिनी आपण "जय महाराष्ट्र " म्हणतो, त्याच महाराष्ट्रात कोणावर अत्याचार होतो आहे त्यामुळे महाराष्ट्राचा जय हो म्हणायच्या ऐवजी महाराष्ट्रात भय आहे अशा अर्थाची ही बातमी आहे.
महाराष्ट्र दिनी "जय हो" म्हणताना ही भीती कशी आहे ते सांगताना "जय " ला जुळणारे "भय " वापरणे हे संपादकांची उर्मी/लालित्य  दाखवणारे असले तरी अर्थात घोटाळा करणारे आहे. नुसते "जय " जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ "जय हो " किंवा "जय होवो " असा असतो . त्यामुळे "भय महाराष्ट्र " म्हणताना "महाराष्ट्राचे भय होवो/ वाटो" अशा अर्थाचे होते व ते संपादकांना इथे अभिप्रेत नाहीय .
जय ही ललकारी आहे तर भय ही एक भावना आहे. जय हे यश ह्या अर्थाने वापरतात . त्याउलट अर्थ उमटवायचा तर "हार" किंवा "पराजय " वापरता येईल. पण भय अनुचितच .
जय महाराष्ट्र ला यमकच करायचे तर काय महाराष्ट्र , खाय महाराष्ट्र , गाय महाराष्ट्र, चय, दय, तय, थय , मय , रय , लय , वय , सय , असे अनेक पर्याय वापरता आले असते पण त्यात अशा महाराष्ट्राचा पराजय होवो असा अर्थ येत ना !
कदाचित ते "अ-जय महाराष्ट्र" णे साधले असते !
--------------------------------------------------------